नगर – बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकाल हा सर्वस्वी मायबाप शेतकऱ्यांचा विजय आहे. 12 वर्षांपासून सुरू असलेला लढा सामूहिक प्रयत्नामुळे जिंकता आल्याचे समाधान राज्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केले असून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे.
महसूलमंत्री विखे म्हणाले की, बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी यासाठी अनेक वर्षे लढा देत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेल्या या लढ्याला न्याय मिळावा म्हणून केलेल्या सामुहिक प्रयत्नांना यश मिळाले आहे.
या स्पर्धेकरीता सरकारने यापूर्वीच केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला, याचे मोठे समाधान निकालातून मिळाले. राज्य सरकारने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी नामवंत वकीलांची टिम उभी केली होती. बैलगाडा संघटनेसमवेत सातत्याने बैठका सुरू होत्या.