नवी दिल्ली – दुबई येथे सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल होण्याच्या भारतीय संघाच्या शक्यता ५०-५० टक्के आहेत. पहिल्या दोन सामन्यात दारुण पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाने पुनरागमन करत अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडविरुद्ध मोठ्या फऱकाने विजय मिळवले. आता अफगाणिस्तानविरुद्ध न्यूझीलंडचा पराभव झाला तरच भारत उपांत्य फेरी गाठू शकणार आहे. असं असताना एका दिग्गज क्रिकेटपटूने फिक्सकडे इशारा केल्याने खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने म्हटलं की, ९० टक्के लोकांच्या मते भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील लढत फिक्स होती. शोएबचे हे वक्तव्य विश्वचषक स्पर्धा सुरू असताना आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
भारत-अफगाणिस्तान सामना फिक्स असल्याचा आरोप पाकिस्तानच्या एका युजरने केला होता. त्यानंतर यावरून अनेक मीम्स व्हायरल झाले. भारताने अफगाणिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २१० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तर अफगाणिस्तान संघ २० षटकांत केवळ १४४ धावा करून शकला. भारताने हा सामना ६६ धावांनी जिंकला. त्यामुळे भातीय संघाचं स्पर्धेतील रनरेट सुधारण्यास मदत झाली.
शोएबने म्हटलं की, भारताविरुद्ध अफगाणिस्तान संघ संपूण ताकदीने मैदानात उतरला नाही. अफगाणिस्तान संघाने साजेसा खेळ केला नाही.त्यामुळे ९० टक्के लोकांना हा सामना फिक्स वाटतो. त्यामुळे न्यूझीलंड अफगाणिस्तान संघाविरुद्धच्या पुढील सामन्यात विजय मिळवू शकला नाही, तर सोशल मीडियावर या सामन्यावरूनही अनेक प्रश्न उपस्थित होतील.