कोरेगाव भीमा/ शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे 1818 मध्ये झालेल्या लढाईमध्ये शौर्य दाखवले गेले. त्या शौर्याचे प्रतिक म्हणून येथे उभारण्यात आलेल्या विजय रणस्तंभाला मानवंदना दिल्याने मोठी ऊर्जा मिळते, असे मत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले. कोरेगाव भीमा येथे शौर्यदिनाच्या निमित्ताने नुकतीच विजय रणस्तंभ येथे हजेरी लावत देसाई यांनी विजय रणस्तंभास अभिवादन केले.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रशांत देसाई, आकाश वढवराव, प्रमोद कुतवळ, मंगल सासवडे, संगीता तावरे, रीना सोनवणे, रमा आठवले, रुक्मिणी बोबडे, अपेक्षा सोनवणे, महिला, पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, त्या म्हणाल्या की, 1818 मध्ये झालेल्या लढाईमध्ये शौर्य दाखवले गेले. त्या शौर्याची मानवंदना देण्यासाठी नागरिक येथे येत असतात.
यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने येथेंधरा लाख भीमसैनिक येथे मानवंदना देण्यासाठी येणार आहेत. समाजबांधवानी येथे शांततेत यावे, असे आवाहन त्यांनी केले. कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ समिती मोठे कष्ट घेत असते. प्रत्येक नागरिकाला त्रास होणार नाही, महिलांचे नियोजन, येथील दुकानदारांची विशेष काळजी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे व सहकारी घेत आहेत.