आळंदी -येथील इंद्रायणी नदी घाट, सिद्धबेट क्षेत्रातील पाण्यात पडलेला प्लॅस्टिक कचरा, सेंद्रिय कचरा, अनावश्यक झुडपे, खराब अन्नपदार्थ, जलपर्णी तसेच जलाशयांमध्ये आढळून येणारे शेवाळ जाळीयुक्त काठ्यांचा वापर करून स्वच्छ करण्यात आले तसेच नदीकाठचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
संत निरंकारी मिशन मार्फत रविवारी (दि. 26) “अमृत परियोजने’अंतर्गत आळंदी येथे “स्वच्छ जल-स्वच्छ मन’ अभियान सकाळी 7 ते 12 या वेळेत पार पडले. या अभियाना अंतर्गत जनजागृती करण्यासाठी पथनाट्यांद्वारे पाण्याचे महत्त्व आणि संरक्षणाच्या प्रति लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात आली, तसेच पाण्यातून होणाऱ्या रोगांच्या बाबतीत माहिती देण्यात आली.