पुणे – गणेश विसर्जन मिरवणूक 2005 मध्ये शिवशक्ती मंडळ यांनी लक्ष्मी रस्त्यावर रात्री 12.30 च्या सुमारास ध्वनिवर्धक वाद्य वाजविण्यास मनाई केल्याच्या आदेशाविरुध्द निषेध म्हणून गणेश विसर्जन रथ थांबविल्यामुळे झालेल्या दंगल प्रकरणातून 38 जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. तब्बल 17 वर्षांनी सर्वांना दिलासा मिळाला आहे. सत्र न्यायाधीश एस.एस.गोसावी यांनी हा आदेश दिला.
बचाव पक्षातर्फे ऍड. लक्ष्मणराव घाडगे पाटील, ऍड. श्रीकांत आगस्ते, ऍड. जयंत गाजुल, ऍड. विजय माने, ऍड. सुरेश देवकर आणि ऍड. देवेंद्र अग्रवाल यांनी काम पाहिले.
2005 मध्ये रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत सार्वजनिक ठिकाणी ध्वनिवर्धक वाद्य वाजविण्यास मनाई करणारा आदेश काढण्यात आला होता. याला निषेध म्हणून गणेश विसर्जन रथ थांबविण्यात आला. त्यानंतर पोलीस अधिकारी अधिकारी समजावून सांगत असताना झालेल्या दंगलीमुळे व काही लोकांनी पोलीस अधिकारी यांच्यावर दगडफेक करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप 38 जणांवर ठेवण्यात आला होता. विश्रामबाग पोलीस स्टशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी जाधव यांनी सर्वांविरुध्द भा. द. वि कलम 307 (जीवे ठार मारणे), 353 (सरकारी कामाथ अडथळासह 345 ,146 ,147 , 149, प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.