तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी दुरंगी, तिरंगी लढती
पौड – मुळशी तालुक्यात 18 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 47 उमेदवार रिंगणात उतरले असून 27 महिलादेखील आअपले नशीब आजमावत आहेत. थेट जनतेतून सरपंचपद मिळवायचे असल्याने उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गावागावात मतदारांच्या सरपंचपद महिलांसाठी राखीव असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी आणि तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.
बेलावडे (सुजाता संतोष ढमाले, छाया संदीप येनपुरे), खुबवली (रोहिणी रामचंद्र ठोंबरे, वैष्णवी हनुमंत पवार), धामणओहोळ (वंदना अमोल शेडगे, सुवर्णा शिवाजी शेडगे), वळणे (अंजना जयवंत सातपुते, रोहिणी रविंद्र सोंडकर), ताम्हिणी (स्वाती निलेश चोरघे, संगीता यशवंत जाधव) या पाच ग्रामपंचायतीत सरळ लढत होत आहे.
तर कोंढावळे (पल्लवी अमित कंधारे, रंजना सागर कंधारे, सुरेखा गणपत कंधारे), मूगाव (लिलाबाई बाळू मरगळे, संगीता मारूती मरगळे, उषा वसंत वाटाणे), आंबवणे (सिता मच्छिंद्र कराळे, शारदा उल्हास मानकर, रूपाली राजेंद्र हुंडारे), शेडाणी (माया सुभाष खिलारे, रूपाली पांडूरंग ढोकळे, वर्षा प्रकाश राऊत), वेगरे (रखमाबाई मारूती कोकरे, राजश्री रामदास मरगळे, रोषणी संतोष कानगुडे) या पाच ग्रामपंचायतीत तिरंगी लढतीचे चित्र आहे.
पुरुषांच्या सरपंचपदाच्या संग्रामातही कॉंटे की टक्कर असे चित्र पहायला मिळणार आहे. माले (सुहास रामचंद्र शेंडे, निलेश ज्ञानेश्वर जाधव), वारक (संतोष सहादू भिलारे, सुजाता अंकुश मराठे), वडगाव (प्रकाश नारायण वाघ, सुभाष भिवाजी वाघ), टेमघर (सचिन मारूती मरगळे, तानाजी कोंडीबा मरगळे) यांच्यात सरळ लढत होणार आहे. दुरंगी लढतीमुळे याठिकाणी प्रत्येकाचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुळशी खुर्द (प्रज्वल विठ्ठल कानगुडे, संतोष विठ्ठल कानगुडे, सुनिल विश्वनाथ पासलकर), भादस (जयकिसन सिताराम जाधव,
ज्योती सदाशिव निकाळजे, विशाल सदाशिव निकाळजे) या दोन ग्रामपंचायतीत तिघांनी सरपंचपदासाठी दंड थोपटले आहेत. तर वांद्रे (अनिकेत प्रभाकर ढमाले, अविनाश दिलीप निंबाळकर, रमेश भिमाजी पडवळ, अनिल किसन शिंदे), आणि जामगाव (किरण नामदेव ठोंबरे, शंकर एकनाथ बांदल, विनोद वसंत सुर्वे आणि हनुमंत चंद्रकांत सुर्वे) या दोन ग्रामपंचायतीत कुणाचे नशीब उजळणार याकडे त्या गावांसह तालुक्याचे लक्ष लागले आहे.
23 ग्रामपंचायतींची निवडणूक
गाठीभेटींसह गुप्तभेटींनाही सुरूवात झाली आहे. तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी संभवे ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव होते, या पदासाठी एकही अर्ज न आल्याने येथील सरपंचपद रिक्त राहीले आहे. वातुंड्यात समिक्षा गायकवाड, जातेडेमध्ये हनुमंत शेजवळ, भांबर्डेमध्ये श्वेता मोरे, डावजेमध्ये सविता शिंदे यांना गावातील ग्रामस्थांनी सरपंचपदासाठी बिनविरोध निवडून दिले आहे.