आंदोलन तीव्र होणार : बैठकीत झाला निर्णय
वाघोली – हवेली तालुक्यातील मुळा मुठा नदी तीरावर असणाऱ्या कृषी पम्पा ला वॉटर मिटर लाऊन, गटार गंगा चे पाण्यावर दहापट रक्कम वसूल करण्याच्या पाटबंधारे निर्णयाला विरोध करण्यासाठी शेतकऱ्याची बैठक नुकतीच पार पडली.
बैठकीत शेतीसाठी स्वच्छ धरणातील पाणी द्या, व योग्य पाणीपट्टी घ्या अन्यथा कुठल्याही शेतकऱ्यांनी या पुढे पाणीपट्टी भरू नये, उलट पक्षी 18 गावे पाणीपट्टीतून मुक्त करा असा ठराव पारित करण्यात आला. खडकवासला पाटबंधारे विभागाने शेती सिंचनासाठी मुळा मुठा नदीत पाणी सोडत नसल्याची माहिती लेखी स्वरूपात दिली असताना, पाणीपट्टी भरमसाट मागणी करणे अन्याकारक आहे.
पुणे शहरासाठी सन 2020 ते 2023 या तीन वर्षात 60. 100 ढ. च. उ. पाणी जलसंपदा विभागाने देऊन दोनशे अठ्ठावीस कोटी नव्वद लाख, चौसस्ट हजार, नऊशे सव्वीस रूपये. त्यापोटी पाणीपट्टी घेतली आहे.
ज्या पाण्यावर एकदा पाणीपट्टी घेतली तेच पाणी वापरानंतर ड्रेनेज द्वारे नदी पात्रात सोडले त्या गटार गंगेच्या पाण्यावर पुन्हा मीटर लाऊन पैसे घेण्याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला. दूषित, घाण, केमिकल, मिश्रीत पाणी शेती वापरासाठी घेतल्याने शेती नापीक होऊन हा व्यवसाय धोक्यात आला आहे.
दूषित पाण्यामुळे जलचर प्राणी, वनस्पती नष्ट होऊन, नदी शेजारी असणाऱ्या फॉरेस्ट मधील वन्य प्राणी हरीण, बिबट्या, कोल्हा, लांडगा, तरस, रानडुक्कर, वन गायी, मोर लांडोर, स्तलांतरीत झाले.नदीपात्रातील मासे कासव मृत पावले. याकामी कृती समितीची स्थापना पुढील लढा देण्यासाठी करण्यात आली. यावेळी माजी आमदार बापूसाहेब पठारे यांना अध्यक्ष, तर पांडुरंग काळे उपाध्यक्ष यांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे. इतर कार्यकारिणीची निवड यावेळी करण्यात आली. यावेळी विविध गावचे सरपंच उपसरपंच व आजी-माजी पदाधिकारी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
पुणे शहराचे वापरलेले ड्रेनेज चे घाण पाणी नदीत सोडून दिल्यावर त्याच गटार गंगेचे पाण्याला, पुनः वॉटर मिटर लाऊन दहा पट पाणीपट्टी आकारणे हा शेतकऱ्यावर मोठा अन्याय आहे. याबाबतचे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे.
– अंकुशराव कोतवाल, शेतकरी नेते, पुणे जिल्हा.