दोन ट्रकसह एक पिकअप खाक : सुदैवाने जीवित हानी नाही
चिंबळी – मरकळ-आळंदी रस्त्यावरील पाण्याचे टाकी जवळील व्यावसायिक जयसिंग रामभाऊ लोखंडे यांच्या गादी कारखान्यास शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन ट्रकसह एक पिकअप आणि पत्राशेड कारखान्याचे आतील साहित्य आणि माल आगीत जळाल्याने प्रचंड वित्त हानी नुकसान झाली. मात्र सुदैवाने या आगीत जीवित हानी झाली नाही.
मरकळ (ता. खेड) येथील कारखान्यातील आग आटोक्यात आणण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले. या आगीची घटना समजताच आळंदी पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ, आळंदी नगरपरिषद, पिंपरी चिंचवड महानगर पालिका व पुणे पीएमआरडीच्या अग्निशामक यंत्रणनेने शर्थीचे प्रयत्न करून सुमारे अडीच तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले.
दरम्यान, आतील गॅस सिलिंडर तात्काळ सुरक्षित बाहेर काढल्याने पुड्ःईल अनर्थ टळला. या लागलेल्या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.
मरकळ (ता. खेड) : येथील गादीचा कारखाना आगीत भस्मसात झाला.