पुणे – पीएमपी सहा ठेकेदारांनी बिल थकल्यामुळे दीड दिवस संप पुकारला होता. अचानक संप करून नागरिकांना वेठीस धरल्यामुळे पीएमपी प्रशासनाने करारानुसार ठेकेदारांना दंड ठोठावला आहे.
संपाच्या काळात ठेकेदारांच्या 1,664 बस बंद राहिल्यामुळे त्यांना दोन कोटी 31 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ठेकेदारांच्या बिलातून ही रक्कम वसूल केली जाणार आहे. पीएमपीच्या सहा ठेकेदारांनी गेल्या महिन्यात संप पुकारला होता. मार्गावर असलेल्या ठेकेदारांच्या बस उभ्या राहिल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले होते.
पीएमपीने त्यांच्या स्वमालकीच्या बसच्या माध्यमातून प्रवाशांना सेवा दिली होती. या संप काळात दहावी व बाराची परीक्षा सुरू होती. त्यामुळे विद्यार्थी व पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. दोन्ही महानगरपालिकांनी पीएमपीला पैसे दिले. यानंतर 30 तासांनी हा संप मागे घेण्यात
आला होता.