वाघोली – वाघोलीचे माजी उपसरपंच तथा अनंत युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शांताराम बापू कटके यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात गेली सात दिवस कार्यक्रम पार पडले. यामध्ये भजन स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, आरोग्य शिबीर आणि नेत्रदीपक असा कीर्तन सोहळा संपन्न झाला.
सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि जबाबदारी जपत अनेक उपक्रमांचे शांताराम बापू कटके मित्र परिवाराच्या वतीने आयोजन केले गेले. वाघोलीच्या वैभवात भर पाडणाऱ्या व हिंदकेसरी किताब पटकावणाऱ्या अभिजीत कटके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शांताराम बापू कटके, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ आव्हाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रोहिदास कटके, गिरगावकर महाराज, पंकज गावडे महाराज, संतोष दातार प्रदीप वळसे पाटील, जयंत वर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.
तुफान लोकप्रिय होत असलेली योजना म्हणजे केवळ वार्षिक हप्ता 399 रुपयांमध्ये दहा लाखांचा अपघातविमा काढणे..!
सुमारे दोनशे लोकांनी याही सुविधेचा लाभ घेतला. एकंदरीत पाचशेच्यावर लोकांच्या आधार कार्डशी निगडित असलेल्या समस्या यशस्वीरित्या सोडविण्यात बापूंना यश आले.
या मेळाव्यासाठी भारतीय डाक विभागाचे (पूर्व विभाग) पब्लिक रिलेशन ऑफीसर गणेश खेडकर , आधारचे ऑपरेटर सौरभ जैस्वाल, संतोष भरेकर, तसेच मोबाईल नंबर लिंकसाठी व अकाऊंट ओपनिंगसाठी अमित नागने, पॉलीसी काढण्यासाठी पांडुरंग आनंदे आणि सुकन्या योजनेसाठी पोस्टमन नामदेव गवळी या सर्व अधिकार्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमांमध्ये योग्य पद्धतीने नियोजन करणाऱ्या सर्व जिवलग कार्यकर्त्यांचे, हितचिंतक, स्नेही, सहभागी स्पर्धक, प्रेक्षक आणि स्थानिक ग्रामस्थांचे कटके आभार व्यक्त केले.
“विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ’ या ज्ञानेश्वर माऊलींच्या उक्तीने खऱ्या अर्थाने माझ्या जीवनात प्रेरणा दिली. संतांच्या भूमीत किर्तन सोहळ्याच्या निमित्ताने हिंदू धर्माचा गजर आणि ज्ञानोबा माऊलींचे नामस्मरण व्हावे हाच माझा उद्देश होता. महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांनी सेवा देत समाजात आपल्या अमृतवाणीने समाज प्रबोधन केले, याचा विशेष आनंद वाटतो.
– शांताराम कटके – माजी उपसरपंच, वाघोली