आळंदी – जेष्ठ साहित्यक प्रा.डॉ.अनिल सहस्रबुध्दे लिखित मनोस्वरूप विचार व संत प्रबोधित मनोस्वरूप विचार पुस्तकांचे प्रकाशन व ७४ वा अभिष्टचिंतन सोहळा आळंदी येथील श्री अगस्ती ऋषी आश्रमात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डाॅ. अभय टीळक तर महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती.
मोरया प्रकाशनचे दिलीप महाजन, मनशक्ति केद्र प्रमुख प्रमोदभाई शिंदे, मनशक्तीचे विश्वस्त केळकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश बागडे यांनी केले व प्रा.डॉ.मालुंजकर यांनी आभार प्रदर्शन केले. भीमसेन महाराज शिंदे यांनी अभंग गायन केले. याप्रसंगी दिगंबर महाराज नरवडे, संदिप महाराज लोहर, अविनाश महाराज धनवे, किशोर महाराज धुमाळ, राजेद्र महाराज नवले, रामनाथ मुतडक, अजीत मालुंजकर, माऊली महाराज सुरडकर, मंगेश महाराज कदम, सुरेशराव कातोरे उपस्थित होते.