नवी दिल्ली : सहामाही परीक्षेनंतरच्या सुटीत भारतातील 50 टक्क्यांहून अधिक मुले काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करतात, असे निरीक्षण ब्रेनली या सहशिक्षणातील शिक्षणातील अग्रेसर संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
देशातील द्वितीय आणि तृतीय स्तरीय शहरात हे सर्वेक्षण करण्यात आले. दिवाळीच्या सुटीत 37.5 टक्के मुलांनी पुढील टर्मचा अभ्यास करणार असल्याचे सांगितले तर 25 टक्के मुलांनी कुटूंबियांसमवेत सुटीचा आनंद घेणार असल्याचे सांगितले. तर 22.5 टक्के मुले कुटूंबियांसोबत परगावी जाणार होती.
सामान्य पध्दतीने सुटीचा आनंद घेणारीमुले एका बाजुला असतानाच संशोधनासह अभ्यासक्रम बाह्य उपक्रम राबविणाऱ्या मुलांची संख्या तब्बल 53. 9 टक्के होती. त्यासाठी वेळ मिळावा म्हणून सुटीत दिलेला अभ्यास दिवाळीपुर्वीच आटोपण्याचा निश्चय त्यापैकी 70.9 टक्के जणांनी व्यक्त केला. सुमारे 55.7 टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात पालक लक्ष घालतात, असे वाटते. याशिवाय अन्य काही शिकण्यास पालक प्रोत्साहन देतात, असेही या मुलांना वाटते.
नवीन भाषा शिकणे, खेळ, वाहन चालवण्यास शिकणे आणि कला, हस्तकला किंवा स्वयंपाक शिकून व्यक्तीमत्व विकसीत करण्याकडे या मुलांचा ओढा आहे. या सर्वेक्षणातून बहुतांश मुलांचा ओढा नवीन काहितरी शिकण्याच्या विविध योजना आखतात, असे आशावादी चित्र यातून पुढे आले.