नवी दिल्ली – देशाची खालावलेली आर्थिक स्थिती आणि निर्माण झालेल्या स्थितीवर उपाययोजना करण्यात सरकारला साफ अपयश येत आहे. उपाययोजना करण्याच्या नावाखाली सरकार केवळ मिडीया मॅनेजमेंट करून दिशाभूल करणारी माहिती पसरवीत आहे असा आरोप कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केला आहे.
सरकारने असला प्रसिद्धीचा थाट न करता देशातील स्थिती सुधारण्यासाठी काही अर्थपुर्ण उपाययोजना केल्या पाहिजेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. सरकारने नोकऱ्या वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी त्यांनी नवीन गुंतवणूक आणली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.