शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून थेट प्रश्न चिन्ह उपस्थित केले. त्यांनी ओबीसी समाजाची बाजू मांडत संताप व्यक्त केला ते म्हणाले,’ सरकारकडून हट्ट पुरवण्याचे काम सुरु आहे. पण, ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना आहे. त्यात तथ्य आहे. ओबीसी समाजही मतदान करतो हे सरकार विसरले आहे असा टोला शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे.
त्यांच्या या प्रतिक्रियेवर वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आंबेडकर यांनी भुजबळांना मोलाचा सल्ला दिला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले,’छगन भुजबळ यांनी पब्लिकली भांडू न भांडता कॅबिनेटमध्ये याविषयावर भांडावं. ते पुढे म्हणाले आणि तेथेही त्यांचे ऐकले जात नसेल तर त्यांनी राजीनामा दयावा. असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी भुजबळ यांना दिला आहे.
ते पुढे म्हणाले,’भुजबळ यांनी राजीनामा दिला तर त्यांच्या म्हणण्याला वजन प्राप्त होईल. नाही तर एका बाजूला सत्ता उपभोगायची आणि दुसऱ्या बाजूला रडत राहायचं या दोन गोष्टी एकत्र कशा राहतील? असा सवाल आंबेडकर यांनी केला.