पेठ- सातगाव पठार (ता. आंबेगाव) भागात अनेक शेतकऱ्यांनी बटाटा पीक घेतले आहे. चालू वर्षी पाऊस चांगला झाल्याने विहिरी, शेततळ्यांमध्ये पाणी भरपूर आहे. त्यामुळे पेठ, कुरवंडी, भावडी, कारेगाव व पारगाव भागात बटाटा पीक जोमात आले आहे.
चालू वर्षी सातगाव पठार भागात जून, जुलै मध्ये लागवड केलेले बटाटे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात काढले. त्यावेळी विक्रमी 300 ते 325 रुपये प्रति 10 किलो बाजारभाव बटाट्याला मिळाला.म्हणजे गेल्या 10 वर्षातील सर्वात विक्रमी बाजारभाव शेतकऱ्यांना मिळाला. त्यामुळे पावसाळी बटाटे काढले व लगेच अनेक शेतकऱ्यांनी नवीन लागवड केली. आता हे पीक दीड ते 2 महिन्याचे झाले आहे.सातगाव पठार भागात थंड हवामान आहे. सध्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेले बटाटे 25 ते 30 रुपये प्रतिकिलो भावाने विकले जात आहेत.त्यामुळे बटाटे काढण्यासाठी साधारण एक ते सव्वा महिना बाकी आहे. सध्या अधून मधून ढगाळ वातावरणामुळे काहीसा परिणाम बटाटा पिकावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीसुद्धा शेतकरी अजूनही आपल्या शेतात नव्याने बटाटे लागवड करत आहे.
बटाटे ऐन फुलोऱ्यात येऊ लागले आहे. वातावरणाचा परिणाम झाला नाही तर 100 किलो बटाटा बियाण्याला साधारण 60 ते 70 किलो वजणाच्या 10 ते 12 पिश्याव्या गळीत निघू शकेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. एक एकरात क्षेत्रात साधारण 50 किलो वजनाचे 16 कट्टे पोती बियाणे लागते. बटाटा लागवड ते काढणी पर्यंत बियाणे, खते, औषधे फवारणी, खुरपणी व काढणी मजुरी व विक्रीपर्यंत एकूण खर्च 50 हजार रुपये येत असल्याचे शेतकरी विशाल तोडकर, रोहिदास चक्कर पाटील, सोपानराव नवले आदी शेतकऱ्यांनी माहिती दिली.