नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतातील जनतेला संबोधित केले. आज ते कोणत्या विषयावर बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पंतप्रधानांच्या भाषणातील पाच महत्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे..
- भारतात कोरोनाच्या अनेक लसिंवर काम सुरू.
- लस विकसित करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू.
- जोपर्यंत औषध येत नाही तोपर्यंत हालगर्जीपणा करू नका.
- प्रत्येक पातळीवर काळजी घेणं आवश्यक.
- सणासुदीच्या काळात हालगर्जीपणा करू नका.
दरम्यान, काही मिनिटांपूर्वीच काॅग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी
एक ट्विट केलं आहे. राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘आपल्या सहा वाजताच्या संदेशात कृपया देशाला तारिख द्या की, तुम्ही चीनला भारताच्या बाहेर कधी काढणार.’ असे ट्विट राहुल गांधी यांनी शेअर केले आहे. हे ट्विट काही मिनिटांमध्येच अनेकांनी शेअर केले आहे.
प्रिय PM,
6 बजे के अपने संदेश में कृपया राष्ट्र को वो तारीख़ बतायें जब आप चीन को भारत भूमि से बाहर निकाल फेंकेंगे।
धन्यवाद।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 20, 2020