कॅनबेरा – आधुनिक काळामध्ये मोबाईल ही अत्यंत महत्त्वाची गरज झाली असली तरी या मोबाईलच्या अतिवापरामुळे नातेसंबंध बिघडूही शकतात कुटुंबातील माणसांमध्ये किंवा मित्रांमध्ये महत्त्वाची चर्चा सुरू असताना जर कोणाकडून मोबाईलचा वापर होत असेल तर त्यातून चुकीचा संदेश जातो आणि नातेसंबंध बिघडू शकतात प्रत्यक्ष भेटून महत्त्वाची चर्चा सुरू असताना. अशा प्रकारे फोनमध्ये डोके घालण्याच्या या प्रक्रियेला फोन फबिंग असे म्हटले जाते.
फोन फबींगच्या या प्रक्रियेमुळे आधुनिक काळात नातेसंबंध बिघडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे ऑस्ट्रेलियातील चार्ल्स स्टुअर्ट युनिव्हर्सिटीतील प्रोफेसर यासलीम अल सगफ यांनी याबाबतचे संशोधन केले असून त्यावर एक पुस्तकही प्रकाशित केले आहे सगफ यांनी हे पुस्तक लिहीण्यापूर्वी याबाबत झालेल्या इतर 170 संशोधनांचाही आढावा घेतला.
त्यानंतर त्यांनी फोन फबिंग दैनंदिन संबंधांमध्ये कशाप्रकारे अडथळे निर्माण करतो याबाबतचे विवेचन या पुस्तकामध्ये केले आहे महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा सुरू असताना जर काही व्यक्ती मोबाईलमध्ये डोके घालून बसल्या असतील तर इतर व्यक्तींना दुर्लक्ष केल्याची भावना वाटते. याचा जास्त परिणाम लहान मुलांवर होतो लहान मुले काही महत्त्वाची गोष्ट सांगत असताना किंवा साध्या गोष्टीसाठी आपला पालकांशी संवाद साधत असताना जर आई-वडील मोबाईलवर बिझी असतील तर त्याचाही थेट नकारात्मक परिणाम मुलांच्या मनावर होऊ शकतो.
आपले आई-वडील आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत अशा प्रकारची नकारात्मक भावना मुलांच्या मनात निर्माण होऊ शकते आपल्या मुलांशी संवाद साधत असताना आई-वडिलांनी मोबाईल पासून जाणीवपूर्वक दूर राहावे असा सल्ला या संशोधकांनी दिला आहे पालकांच्या अशा फोन फबिंग मुळे मुलांमध्ये सुद्धा मोबाईलचा अतिवापर करण्याची सवय वाढू शकते आधुनिक काळात पती आणि पत्नीमध्ये भांडण होण्याचे प्रमाणही केवळ मोबाईलच्या अतिवापरामुळे वाढले आहे.
पती किंवा पती एकमेकाला महत्त्वाची गोष्ट सांगत असतानाच जर दुसरी व्यक्ती मोबाईल मध्ये बिझी असेल तर त्याचाही थेट परिणाम पहिल्या व्यक्तीवर होतो आपण जी गोष्ट महत्त्वाची सांगत आहोत त्याला दुसरी व्यक्ती महत्त्व देत नाही अशी नकारात्मक भावना जोडीदाराच्या मनात निर्माण होते आणि त्यातूनच वाद विवाद सुरू होतात कामाच्या ठिकाणी सुद्धा बॉस कडून जर फोनचा अतिरिक्त वापर होत असेल तर त्याचाही चुकीचा परिणाम कर्मचाऱ्यांवर होतो फोन फबिंग मुळे जे सामाजिक नातेसंबंध बिघडत आहेत त्यावर सुधारणा करण्यासाठी कौटुंबिक पातळीवर आणि सामाजिक पातळीवर मोबाईल वापराचे नियम करावेत आणि प्रत्यक्ष भेटीत चर्चा होत असताना मोबाईल संपूर्णपणे दूर ठेवावेत अशा सूचना या अहवालात देण्यात आल्या आहेत.