नाशिक – राज्यातील प्रमुख महापालिका निवडणुकांची रणधुमाळी लवकरच सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमधील अनेक मनसे नेत्यांची बैठक घेत त्यांना थेट इशारा दिला आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बंड करणाऱ्या अनेक नेत्यांना राज ठाकरेंनी तंबी दिली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
ज्यांना पक्ष सोडून जायचे असेल त्यांनी खुशाल जावे. पण गेल्यानंतर होणाऱ्या परिणामांना देखील सामोरे जा, असा दम राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यावर अनेक जण नाराज होतात आणि बंड करतात. त्यापेक्षा आत्ताच जा. अचानक गेल्यापेक्षा आत्ता गेलात तर बरे होईल, असेही राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे लवकरच नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. पुर्ण ताकदीने निवडणुकाला सामोरे जाण्याचे आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत चुरस पहायला मिळणार आहे.