मुंबई – एसटी महामंडळाचे राज्यातील सुमारे 105 डेपो सुरू झाले आहे. राज्यभरातील विविध आगारात सुमारे 19 हजार कर्मचारी कर्तव्यावर रूजू झाले आहेत. कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सोमवारी 250 आगारांपैकी 105 आगारातून वाहतूक सुरु झाली आहे. मात्र अजुनही काही कर्मचाऱी संपावर ठाम आहेत. या संपकरी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी अखेरचा इशारा दिला.
एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा, या मागणीसाठी काही संप रकरी कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे एकूण दहा हजार कामगारांना निलंबित करण्यात आलं आहे. मात्र, या कामगारांना एक संधी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
दरम्यान सोमवारपर्यंत कर्मचारी कामावर आले तर त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल, असं सांगतानाच सोमवारपर्यंत मेस्मा न लावण्याचा तूर्तास निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. आम्हाला कामावर यायचं आहे. पण काही लोक येऊ देत नाही असं काही कर्मचाऱ्यांचं म्हणणं असल्याचं परब यांनी म्हटलं.
जो डेपो 50 टक्के संख्येने सुरू होईल त्यांना तिथेच कामावर घेऊ. पण जिथे ही संख्या पूर्ण होत नाही. त्यांना बाजूच्या डेपोत सामावून घेतलं जाणार आहे. त्याबाबतचे लेखी आदेश काढणार आहोत, असंही परब यांनी स्पष्ट केलं.