Pakistan : पाकिस्तानमध्ये सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. पाकिस्तानातही मतदानानंतर नागरिकांच्या हातावर खुणा केल्या जातात. पण भारतात मतदानानंतर लावलेल्या चिन्हापेक्षा हे थोडे वेगळे चिन्ह आहे. भारताप्रमाणेच पाकिस्तानमध्येही निवडणुकीत मतदान केल्यानंतर हातावर शाई लावली जाते. पण पाकिस्तानचा मार्ग भारताच्या मार्गापेक्षा जरा वेगळाच आहे.
आपल्याकडे भारतात जेव्हा निवडणुका होतात. तेव्हा जो कोणी व्यक्ती मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जातो. त्यानंतर त्याच्या हाताच्या एका बोटावर शाईने निशाणा लावला जातो. कोणताही मतदार जो मतदानासाठी येतो. निवडणूक घेणारे संबंधित अधिकारी त्याच्या डाव्या हाताच्या बोटाच्या नखावर निळी शाई लावतात. ज्याद्वारे मतदान केले आहे की, नाही हे कळते.
सध्या पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. पाकिस्तानातही मतदानानंतर हातावर खुणा केल्या जातात. पण भारतात मतदानानंतर लावलेल्या चिन्हापेक्षा हे वेगळे चिन्ह आहे. ते नखांवर लावले जात नाही.
पाकिस्तानमध्ये, जेव्हा मतदाराला मतदान केल्यानंतर निळ्या शाईने चिन्हांकित केले जाते. तेव्हा हाताच्या बोटाऐवजी त्यांच्या अंगठ्यावर शाई लावण्यात येत. भारतात ही खूण डाव्या हाताच्या बोटाच्या नखावर असते. तर पाकिस्तानमध्ये ते अंगठ्याच्या त्वचेवर लावले जाते. पाकिस्तानमध्येही या चिन्हाचा उद्देश एकच आहे, कोणाला मतदान केले आणि कोणाला नाही हे जाणून घेणे.
मतदान केल्यानंतर हातावर जी शाई लावली जाते त्याला निवडणूक शाई आणि अमिट शाई म्हणतात. जे लागू केल्यानंतर 72 तासांपर्यंत मिटवता येत नाही. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने एकदा मतदान केल्यावर तो खोटे मतदान करू शकत नाही. त्यामुळे मतदान केल्यानंतर या शाईला खूप महत्व प्राप्त होते.