इंदापूर (प्रतिनिधी) – इंदापूर शहरातील ऐतिहासिक मालोजी राजांची गढी प्रवेशद्वाराचा बुरुंज पावसाने ढासळलेली असून, या गढी साठी कधी निधी येणार, आमचा इतिहास पुसत चालला आहे.
ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या गढीचे संवर्धन कधी होणार याकडे शासनाने त्वरित लक्ष द्यावे अन्यथा नागरिक संघर्ष समिती तीव्र लढा देईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीचे प्रमुख प्राध्यापक कृष्णा ताटे, शिवसेनेचे पदाधिकारी तसेच इंदापूरचे माजी नगरसेवक यांनी ढासळलेल्या बुरुंज याची पाहणी केली.
गढीचे काम तात्काळ सुरू व्हावे अन्यथा इंदापूर शहरात या महत्त्वाच्या प्रश्नासंदर्भात आक्रमक भूमिका नागरिक घेण्याच्या तयारीत दिसत आहेत.