Operation Ajay : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना ‘हमास’च्या हल्ल्यानंतर इस्रायलमधील युद्धातून सुटका करून ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत आणखी १९७ भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे. या नागरिकांना रविवारी (15 ऑक्टोबर) सकाळी चार्टर्ड विमानाने दिल्लीत आणण्यात आले.
दिल्ली विमानतळावर इस्रायलहून परतलेल्या भारतीय नागरिकांचे केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी स्वागत केले. विमानतळावर उतरलेल्या भारतीय नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट होती. यावेळी मंत्री कौशल किशोर म्हणाले, “मी पंतप्रधान मोदी, परराष्ट्र मंत्रालयाचे आभार मानतो आणि त्यांचे अभिनंदन करतो… पंतप्रधान मोदी देशाच्या नागरिकांसाठी समर्पित आहेत. भारतीय नागरिकांना इस्रायलमधून येथे सुखरूप आणले जात आहे. त्यांच्या देशात परतल्यानंतर ते आनंदी आहेत. ” ,
#OperationAjay moves forward.
197 more passengers are coming back to India. pic.twitter.com/ZQ4sF0cZTE
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 14, 2023
तेल अवीव, इस्रायलमधील भारतीय दूतावासाने ट्विटरवर लिहिले ,”ऑपरेशन अजयचे तिसरे फ्लाइट तेल अवीवहून दिल्लीला निघाले आहे. दूतावास सर्वांना सुरक्षित प्रवासासाठी शुभेच्छा देतो.” केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विटरवर देखील लिहिले, “ऑपरेशन अजय, आणि 197 भारतीयांना परत आणले जात आहे.”
यापूर्वी शनिवारी ऑपरेशन अजय अंतर्गत, तेल अवीव, इस्रायल येथून 235 भारतीय नागरिकांना घेऊन दुसरे विमान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. शुक्रवारी (12 ऑक्टोबर) देखील 212 भारतीय नागरिकांना परत आणण्यात आले. आतापर्यंत एकूण 644 लोकांना परत आणण्यात आले आहे.