नवी दिल्ली – इस्रायलमध्ये अडकलेल्या 235 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचे आणखीन एक विमान आज नवी दिल्लीत दाखल झाले. “ऑपरेशन अजय’अंतर्गत इस्रायलमधील नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी एअर इंडियाची विमाने इस्रायलमध्ये पाठवली जात आहेत.
आज बारतात परत आणण्यात आलेल्या 235 भारतीयांपैकी 33 जण केरळमधील आहेत, असे केरळ सरकारने म्हटले आहे. शुक्रवारी इस्रायलमधील 200 पेक्षा अधिक भारतीयांना परत आणणारे पहिले विमान दिल्लीत दाखल झाले होते. परराष्ट्र राज्य मंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी विमानतळावर सर्व भारतीयंचे स्वागत केले होते.
भारतात परत यूे इच्छिणाऱ्या भारतीयांना इस्रायलमधील दूतावासाकडे परतीच्या सुविधेसाठी नोंदणी करण्याची सूचना दूतावासाच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच सतर्कता बाळगण्याची आणि दूतावासाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.