Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिली आहे. त्यामुळे मुंबईत येत्या 20 जानेवारीपासून आंदोलन करणार आहे. आता मुंबईकडे कूच केल्याशिवाय पर्याय नाही. राज्यातील गावोगावचे साखळी उपोषण स्थगित करून लोकांनी मुंबईला पायी प्रवासाची तयारी करावी, असे आवाहन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले आहे.
मात्र, याच बरोबर गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे हे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचं देखील बोललं जात होत. दरम्यान, आता यावर स्वतः जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी राजकारणात जाणार नाही…मराठा समाजाने राजकारणात जाण्यास सांगितलं तर मी हिमालयातच जाईल’, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
काय म्हणाले मनोज जरांगे…..
‘मी प्रामाणिक आहे. जे पोटात आहे ते ओठात आहे. काहीही होऊ दे, समाजाच्या हितासाठी थेट आंदोलन करायचं. गोरगरिबांच्या लेकरांसाठी मला त्यांच्या पदरात आरक्षण टाकायचं आहे. 20 तारखेपासून जीवाची पर्वा न करता रातपाठ एक करायची, तर मी गोरगरीब मराठा समाजासाठी लढलो माझा समाज माझ्यावर कसलाच अविश्वास करीत नाही.
मी 20 जानेवारी तारीख सांगितली समाजाने लगेच मान्य केलं, समाज आता तयारीला लागला आहे. समाजाबद्दल मला एक टक्काही शंका नाही पण राजकारण नकोच, जण आंदोलनातून मी समाजाला न्याय मिळवून देऊ शकतो, सत्तेत नसताना मी 54 लाख लोकांना न्याय देऊस शकलो, मग सत्तेत जाण्याची गरज नाही, असं स्पष्ट जरांगे म्हणाले.