आपण 21 व्या शतकात स्त्रियांबद्धलची परिस्थिती बदलली आहे स्त्री पूर्वी पेक्षा खूप शिकली आहे. सामाजिक राजकीय,सांस्कृतिक, प्रशासकीय, अशा सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया काम करत असल्या तरी गावगाड्याती स्त्रियांचं परिस्थिती फारशी बदलली नाही.कारण आजही त्यांना पुरुषांकडून होणारा अन्याय गुपचूप सहन करावा लागतोय. सासू सासऱ्याचे बोलणे सहन करावे लागते,नवरा कितीही चुकला तरी त्याला तुम्ही हे चुकीच केलं आहे असं म्हणू शकत नाही,कारण खेड्यांमध्ये बायका जास्त बोलल्या म्हणजे जास्तच शाहाणी झालीस काय? म्हणून छळ केला जातो. हे छळ कशा पद्धतीने करतात ते पाहूया…
खेड्यांमध्ये नवरा कितीही दारू पिऊन आला तरी बायकोने काहीही बोलायचे नाही,कारण तो घरातला कर्ता व कमवता आहे म्हणून मग तो दारू पिऊन आला काय किंवा विवाहबाह्य संबंध ठेवले काय, त्या बिचाऱ्या बायकोला सहन करावे लागते,नवरा रोज दारू पिऊन येतो,रोज मारतो तरीही त्याच्यासाठी जेवण बनवायचे वेळेप्रसंगी सर्व कामे करावी लागतात.कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर कुटुंबातील सर्व सदस्याना विचारावे लागते,एकाबाजूला आपण स्त्रियांनी खूप प्रगती केली आहे म्हणतो,स्त्रियांनी सर्व क्षेत्रात स्थान निर्मान केले आहे म्हणतो दोन,चार उदाहरणे पाहून पण खऱ्या अर्थाने महिलांना स्वातंत्र्य आहे का? याचा विचार केला पाहिजे गावांमध्ये आजही स्त्रीला स्वतः हा निर्णय घेता येत नाही,याचाही विचार केला पाहिजे,महिला-महिला यांमध्ये खूप मोठा संघर्ष आहे,कारण सासू सुनेच पटत नाही नणंद जाऊ यांचंही पटत नाही,याचाही विचार केला पाहिजे,कारण घरातली एखादी स्त्री आजारी असेल तर तिला कामात मदत केली जात नाही. महिला दिनानिमित्त हा महिलांचा छळ कसा थांबवता येईल यावर विचार केला पाहिजे.
– वैभव माने,
कॉलेज रिपोर्टर,
मॉडर्न कॉलेज गणेशखिंड