बुद्धिमत्ता चाचणी हा विषय आज
विज्ञानाच्या पातळीवर मान्यता पावलेला आहे. याद्वारे विद्यार्थ्याचा कल जाणून घेता येतो. मन, मेंदू, मानव याच्या समसमा संयोगाने बुद्धिचा विकास होत असतो. माहिती घेणे, त्याचे विश्लेषण करणे, आवश्यक माहिती साठवून ठेवणे, तिचा उपयोग कसा करता येतो, हे उपयोजनात शिकणे, परिस्थिती, प्रसंग, संकट, भावभावना, नातेसंबंध, समाज, देश होऊ शकणारे परिणाम व याचा विचार करुन निर्णय घेणे व त्यानुसार आचरण करणे ही सर्व भव्यदिव्य प्रक्रिया बुध्दिमत्तेवर अवलंबून असते.
अक्राळविक्राळ करोना विषाणामुळे ऑनलाइनचे प्रस्थ प्रचंड वाढले आहे. मोबाईल, कॉम्प्युटर हे शब्द सांप्रतकाळी परवळीचे शब्द झाले आहेत. विज्ञानाचा हा अविष्कार करोना समान फैलावला आहे. कोणाला त्याबद्दल नाराजी नाही. विज्ञान आवश्यक आहे. सायबर गुन्हे वाढत आहेत, त्याबद्दल चिंता मात्र आहे.
लेखाचा हेतू ऑफलाइन बुध्दिमत्तेचा आहे. आज समाजाची वर्गवारी मोजण्याची पध्दती बदलली. समाजाप्रमाणे विद्यार्थी सुध्दा ऑनलाइन व ऑफलाइन झाले आहेत. ही वर्गवारी वाढत जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचे काही दुष्परिणाम सर्वांसमोर आलेले आहेत.
खरा प्रश्न असा अहे की, यामुळे बुध्दिमत्तेमध्ये फरक पडतो आहे का? यंत्राच्या आधारे माहिती अधिक मिळू शकते हे मान्य केले, तरी ही माहिती म्हणजे (ऊरींर उेश्रश्रशलींळेप) डाटा कलेक्शन होय.
ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम, स्वामी विवेकानंद यांच्या सारख्या थोर संतांची नावे आपणास वंदनीय आहेतच. त्यांच्यावेळी कॉम्प्युटर नव्हते हे सांगण्याची वेळ नाही.
पण अगदी वीस वर्षांपूर्वी सुध्दा कॉम्प्युटरचा प्रचार, प्रसार मोठ्या प्रमाणात झाला नव्हता. मोबाइल आज जरी शहरी भागात दिसत असला, तरी दुर्गम भागात वानवाच आहे. शिवाय दहा वर्षांपूर्वी मोबाईल मोजक्या हतात असायचा. शिक्षण पध्दती कित्येक वर्षापासून चालू आहे व काल परत्वे आवश्यक बदल होत आले आहेत. शैक्षणिक साहित्याची यादी सांगण्याची गरज नाही. विचार फक्त ऑनलाइन व ऑफलाईन संबंधी करायचा आहे.
आज जे पालक चाळीस वर्षांचे असतील, त्यातील 95 टक्के पालक ऑफलाइन मध्येच शिक्षण घेतलेले आहेत. शिक्षण पूर्ण करुन आपआपल्या उद्योग व्यवसाय, नोकरी पेशात कार्यरत आहेत. त्यांचे शैक्षणिक जीवन त्यांना आठवत असेलच. तेथे साक्षर करणे हाच एकमेव हेतू नसतो. साक्षर होणे, शिक्षित होणे, दीक्षित होणे या शिक्षणाच्या पायऱ्या असून, एक उत्तम नागरिक एक उत्तम मनुष्य, घडवणे हा हेतू शिक्षणाचा असतो. हा हेतू ऑनलाइन शिक्षणाचे पूर्ण होतो का? माझ्या पाहण्यात तरी असे एकही उदाहरण नाही.
बुध्दिमत्ता चाचणी हा विषय आज विज्ञानाच्या पातळीवर मान्यता पावलेला आहे. याव्दारे विद्यार्थ्याच कल जाणून घेता येतो. मन, मेंदू, मानव याच्या समसमा संयोगाने बुध्दिचा विकास होत असतो. माहिती घेणे, त्याचे विश्लेषण करणे, आवश्यक माहिती साठवून ठेवणे, तिचा उपयोग कसा येतो हे उपयोजनात शिकणे, परिस्थिती, प्रसंग, संकट, भावभावना, नातेसंबंध, समाज, देश होऊ शकणारे परिणाम व याचा विचार करुन निर्णय घेणे व त्यानुसार आचरण करणे ही सर्व भव्यदिव्य प्रक्रिया बुध्दिमत्तेवर अवलंबून असते.
विद्यार्थ्यांपेक्षा हा प्रश्न पालकांमध्ये जास्त चर्चिला जातो आहे. ते स्वाभाविक आहे. आज या विषाणूमुळे दुर्दैवाने पालकांमध्ये दोन वर्ग पडलेले दिसतात. ही वर्गवारी छुप्या पध्दतीने आर्थिक निकषावर आहे. आपल्या पाल्याना ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करुन देणारे व आपल्या पाल्याना अशी सुविधा पुरवू शकत नाहीत, अशा पालकांनी सुध्दा थोड्या वेगळ्या दृष्टीने या विषयाकडे पाहिले की अनेक प्रश्नांची उत्तरे उपलब्ध होतील आणि पाल्यांचे भवितव्याची काळजी करण्याचे कारण राहणार नाही.
ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या पालकांनी असा समज करुन घेऊ नये की आता आपला मुलगा आपली मुलगी एकदम बुध्दिमान झाली. आत त्यांच्या भविष्याची काळजी नाही. उलट जे यंत्र विद्यार्थ्यांच्या हातात आहेत, त्याचा योग्य उपयोग, योग्य वापर त्याच्याकडून होतो आहे ना, याके त्यांनी लक्ष द्यावे.जे पालक विद्यार्थ्यांना मोबाईल, लॅपटॉप घेऊन देऊ शकत नाहीत, त्यांनी सुध्दा आपली दृष्टी बदलली पाहिजे.
माझ्या पाल्याचे कसे होणार? त्याच्याकडे मोबाईल नसल्याने त्याच्या शिक्षणात उणीव राहणार का? त्याला चांगले शिक्षण आता कसे उपलब्ध होईल? त्याचे भवितव्य संपून जाणार का? असे विचार करण्याचे प्रयोजन नाही. या पालकांनी लक्षात घ्यावे की रस्त्यावरील दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करणारे, दुर्गम भागात शिक्षणाची वानवा असताना सुध्दा उपलब्ध साधनांच्या आधारे अभ्यास करणारे असे लक्षावधी विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
ऑफलाइन शिक्षण झाले तरी प्रगती करता येते. बुध्दिमत्ता ऑफलाइन किंवा ऑनलाइन यावर अवलंबून नसते.एकाच वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम एकच असतो. शिक्षक एकच असतात. परीक्षा एकच असते तरी ही प्रत्येकाचा परीक्षेचा निकाल वेगवेगळा असतो. कोणी 90 टक्क्याच्या वर गुण मिळवतो तर कोणी नापास होतो. यामध्ये काही ऑफलाईन शिक्षण घेणारे गुणवत्ता यादीत येताना दिसतातच. एकच बाब लक्षात येते बुध्दिमत्ता सारखी नसते आणि ऑफ लाइन बुध्दिमत्ता कमी नसते.
– प्रा. मधुसूदन मुळे