नवी दिल्ली – भारतामध्ये चिनी फोनविरुद्ध वातावरण निर्मिती झाल्यामुळे आता इतर देशातील मोबाइल कंपन्या भारतीय बाजारपेठेकडे वळू लागल्या आहेत. भारताच्या अंतर्गत सुरक्षेला धक्का न पोहोचविता आम्ही काम करतो असे नोकिया कंपनीने म्हटले आहे.
भारतामध्ये नोकियाचे फिचर फोन लोकप्रिय होते. मात्र नंतर स्मार्ट फोन आल्यानंतर चिनी कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेवर प्रभुत्व मिळविले. आता नोकिया बरोबरच सॅमसंग ही कंपनी भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या दोन कंपन्यांनी अनेक स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उपलब्ध करण्याची तयारी सुरू केली आहे.