नवी दिल्ली सनातन धर्मावरील द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्या टिप्पणीवर निशाणा साधत हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी शनिवारी म्हटले आहे की पृथ्वीवरील कोणतीही शक्ती सनातन धर्म नष्ट करू शकत नाही आणि ज्यांनी तो संपवण्याचा प्रयत्न केला ते कधीही यशस्वी झाले नाहीत.
द्रमुकचे दुसरे नेते ए राजा यांनी सनातन धर्माची तुलना कुष्ठरोग आणि एचआयव्ही सारख्या रोगांशी केली त्यांचे हे वक्तव्य म्हणजे हिंदु फोबिया असल्याचे भाजपकडून सातत्याने नमूद केले जात आहे. या संबंधात एका निवेदनात ठाकूर म्हणाले की, “तथाकथित” बुद्धिजीवी आणि इंडिया आघाडीचे नेते गप्प बसून अशा टीकेचे समर्थन करत आहेत.
कॉंग्रेस आणि त्यांचे सहकारी सनातन धर्माला बदनाम करत असल्याचा आरोप करून ठाकूर म्हणाले की, त्यांची मानसिकता उघड झाली आहे.इंडिया गटाच्या नेत्यांनी सनातन धर्माविरुद्धचा त्यांचा दुष्प्रचार थांबवावा, असे ते म्हणाले. सनातन धर्मावर हल्ला करण्याचा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी हे जाणून घेतले पाहिजे की असे प्रयत्न गेल्या 1000 वर्षांपासून केले जात आहेत, परंतु ते कधीही यशस्वी झाले नाहीत.
पृथ्वीवरील कोणतीही शक्ती सनातन धर्म नष्ट करू शकत नाही आणि ज्या आक्रमकांनी सनातन धर्म संपवण्याचा प्रयत्न केला ते स्वतःच संपले,असे ठाकूर म्हणाले.