N]itish Kumar : बिहारमध्ये राजकीय हालचाली सातत्याने वाढत आहेत. या सर्व राजकीय गदारोळात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. नितीश कुमार आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात, असे मानले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितीश कुमार यांनी भाजपसोबत सरकार बनवल्यास राज्यात दोन उपमुख्यमंत्री बनवले जाऊ शकतात. ज्यामध्ये सुशील मोदी आणि रेणू देवी यांची नावे पुढे जात आहेत.
बिहारमधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपनेही आपल्या आमदारांची बैठक बोलावली आहे. पुढील रणनीती ठरवण्यासाठी भाजपच्या पाटणा पक्ष कार्यालयात आज भाजप आमदार आणि खासदारांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर सरकारबाबत काही मोठे संकेत मिळण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांच्याबाबत बिहार भाजपचे प्रमुख सम्राट चौधरी म्हणाले की, त्यांनी ना राजीनामा दिला आहे ना कोणी पाठिंबा काढला आहे. काही झाले तरच माहिती मिळेल. सध्या भाजपला बिहारमधील परिस्थितीचा अंदाज घ्यायचा असून त्यानंतर आम्ही त्यानुसार निर्णय घेऊ.
जेडीयू-आरजेडी-काँग्रेस युती तुटण्याच्या मार्गावर
बिहारमधील जेडीयू-आरजेडी-काँग्रेस युती तुटण्याच्या मार्गावर आहे. नितीश कुमार पुन्हा एनडीएमध्ये सामील होऊ शकतात. NDA सोडून नितीश कुमार यांनी 2022 साली ‘महागठबंधन’ स्थापन करण्यासाठी वेगळे केले होते. जर बिहारमध्ये लोकसभेच्या जागांविषयी पाहिले लोकसभेच्या 40 जागा आहेत, त्यापैकी 17 भाजप खासदार आहेत आणि 16 जेडीयू खासदार आहेत.
नितीशकुमार चौथ्यांदा पक्ष बदलतील
नितीश कुमार यांनी भाजपसोबत आघाडी करून सरकार स्थापन केले तर चौथ्यांदा त्यांनी बाजू बदलली आहे. सध्या जेडीयूकडे 45 तर आरजेडीकडे 79 आमदार आहेत. तर भाजपचे 78 आमदार आहेत. काँग्रेसकडे 19 जागा, सीपीआय (एम-एल) 12, सीपीआय (एम) आणि सीपीआय प्रत्येकी दोन, हिंदुस्थानी अवाम मोर्चा (सेक्युलर) 4 जागा आणि एआयएमआयएमकडे एक जागा आहे, तसेच एक अपक्ष आमदार आहे.