Nitish Bhardwaj Smita Ghate : महाभारत या मालिकेत कृष्णाची भूमिका करणाऱ्या नितीश भारद्वाज या अभिनेत्याने पत्नी आपल्या मुलांना भेटू देत नाही, असा आरोप एका मुलाखतीत केला होता. आता त्याला उत्तर देताना त्यांच्या पत्नी आणि आयएएस अधिकारी स्मिता घाटे यांनी म्हटले आहे की असे काहीही घडलेले नाही. उलट त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न नितेश भारद्वाज यांच्याकडून केला जात आहे.
महाभारत मालिकेत कृष्णाची भूमिका करणारे नितीश भारद्वाज आणि त्यांच्या पत्नी स्मिता घाटे यांच्यातील वाद सध्या थांबण्याचे नाव घेत नाही. यासंदर्भात नितीश भारद्वाज यांनी मुलाखत देऊन स्मिता घाटे यांच्यावर काही आरोप केले होते. त्यानंतर स्मिता घाटे यांनी देखील नितेश भारद्वाज यांचे आरोप हे खोटे असल्याचे सांगून आरोपांचा इन्कार केलेला आहे. त्यांचे असे म्हणणे आहे, की असे आरोप करून माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न नितीश भारद्वाज यांच्याकडून केला जात आहे. | Nitish Bhardwaj Smita Ghate
नितीश भारद्वाज आणि स्मिता गेल्या काही वर्षांपासून वेगळे राहत असून त्यांच्या मुलांचा ताबा कोणाकडे असावा यावरून वाद चालू आहे. त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया देखील प्रलंबित आहे. स्मिता घाटे यांनी असे म्हटले आहे, की नितीश यांनी माझ्यावर असा आरोप केला होता, की मी माझ्या जुळ्या मुलींचे अपहरण केलेले आहे आणि मी त्यांना नीतीशला भेटू देत नाही. हा आरोप पूर्णपणे निराधार आहे.
स्मिता यांनी सांगितले, की नितीश भारद्वाज हे 17 फेब्रुवारी आणि दोन जानेवारी 2024 रोजी पुण्यामध्ये मुलींना भेटले होते. त्याचबरोबर 2022 मध्ये लँडलाईन वरून त्यांनी मुलींची अनेकदा संवाद साधला होता. स्मिता यांनी असाही दावा केला, की नितीश यांनी कौटुंबिक न्यायालयात ही बाब मान्य केलेली आहे की त्यांनी मुलींशी फोनवर बोलणे केले आहे. दुसरीकडे नीतीश यांच्याकडून असे सांगितले जाते आहे, की मुलींशी त्यांना फोनवर देखील बोलू दिले जात नाही. | Nitish Bhardwaj Smita Ghate
स्मिता घाटे या पुण्याच्या असून त्यांचे शिक्षण लोहगावच्या सेंट्रल स्कूलमध्ये आणि नंतर सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये बारावीपर्यंत झाले. त्यानंतर पुण्यातीलच नौरोसजी वाडिया कॉलेजमधून त्यांनी मायक्रोबायोलॉजी या विषयात बी.एसस्सी. पदवी संपादन केली. त्याचबरोबर त्यांनी समाजशास्त्र विषयाती पदव्युत्तर पदवी देखील संपादन केलेली आहे. त्या मध्यप्रदेश केडरच्या आयएएस अधिकारी आहेत.
14 मार्च 2009 रोजी त्यांनी महाभारत मालिकेतील अभिनेता नितेश भारद्वाज याच्याशी लग्न केले. दोघांचेही हे दुसरे लग्न होते. दोघांचाही पहिला घटस्फोट झालेला होता. दोघांची ओळख त्यांच्या एका कॉमन मित्रांमुळे झाली आणि मग दोन-तीन वेळा भेटल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2022 मध्ये नितीश भारद्वाज यांनी आपल्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती माध्यमांना दिली होती. लग्नानंतर बारा वर्षांनी दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.