आळंदी – विधायक सामाजिक कार्य करणारे पत्रकार, वृत्तपत्र यांचे पाठीशी समाजाने उभे राहण्याची आवश्यकता असून वृत्तपत्रांना अधिक राजाश्रय मिळावा, असे मत यशवंत संघर्ष सेनेचे अध्यक्ष विष्णु कुऱ्हाडे यांनी व्यक्त केले.
येथील यशवंत संघर्ष सेना व एल्गार सेने महाराष्ट्र राज्य यांचे वतीने आयोजित प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त युवक दिन विविध उपक्रमांनी आयोजित करण्यात आला. यात जयंती निमित्त स्मृतीस अभिवादन करीत युवक दिना निमित्त स्थानिक पत्रकारांचा सन्मान सोहळा उत्साहात झाला. यात दैनिक प्रभातचे महादेव पाखरे, सुनील बटवाल यांच्यासह अर्जुन मेदनकर, भानुदास पऱ्हाड, दादासाहेब कारंडे, अनिल जोगदंड, दिनेश कुऱ्हाडे, हमीद शेख, गणेश वारे, विठ्ठल शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उद्योजक उदय काळे, करण कोल्हे, संघर्ष सेनेचे उपाध्यक्ष भागवत काटकर,पुणे जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब कवळासे, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख गणेश गलांडे, सिद्धेश्वर सलगर, नवनाथ घायल, राजेंद्र घुंडरे पाटील, ओमकार महाराज वैद्य, कल्याण महाराज कल्याणकर, सिद्धू सलगर, बाबासाहेब जोरवर, शांताराम बोबडे, बाप्पू बगडे, योगेश धोत्रे, माऊली बुधवंत, नरेश निळे, नामदेव मात्रे, एकनाथ म्हस्के, सुरज हाके, गलांडे साहेब, नवनाथ गायाळ, माऊली निळे, तान्हाजी जुकुले आदी उपस्थित होते.