नवी दिल्ली – भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात योगदान दिलेला देशातील सर्वात जुना पक्ष, काँग्रेस, आज अशा टप्प्यातून जात आहे, ज्यामधून भारतातील क्वचितच कोणत्याही पक्षाने शिखर गाठले असेल. परिस्थिती अशी आहे की १९९१ नंतर केवळ एकदाच म्हणजे २००९ च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला२०० जागांचा पल्ला गाठता आला होता. यावेळीही हा आकडा गाठण्यासाठी पक्षाला चमत्काराची अपेक्षा करावी लागणार आहे. शिवाय स्वत:च्या बळावर २७३ जागांचे लक्ष्य गाठणे हे पक्षासाठी सध्या तरी एककाशक्यप्राय स्वप्नच मानले जात आहे.
१९८४ चा विक्रम अबाधित
सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसची मते ४८ टक्क्यांवर गेली. जागाही विक्रमी ४१४ पर्यंत वाढल्या. हा असा विक्रम आहे ज्याची पुनरावृत्ती ना काँग्रेस करू शकली ना गेल्या दहा वर्षात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला भाजप त्याच्या जवळ पोहोचू शकला. २०१४ मध्ये भाजपला २८२ तर गेल्या निवडणुकीत ३०३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजपने ४०० हून अधिकचा नारा दिला आहे.
१९८९ पासून काॅंग्रेसला स्वबळावर बहुमत नाही
लोकसभेत बहुमतासाठी १७२ जागांची आवश्यकता आहे. १९८४ नंतर काँग्रेसला स्वबळावर बहुमत मिळालेले नाही. १९८९ मध्ये त्यांना ३९.५३ टक्के मते आणि १९७ जागा मिळाल्या होत्या. १९९१ मध्ये, उदारीकरणाच्या काळात, पक्षाला ३६.४० टक्के मते आणि २४४ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी प्रथमच भाजपला १२० जागा मिळाल्या होत्या आणि त्यांची मते २० टक्क्यांहून अधिक होती.
अशी आहे काॅंग्रेसची कामगिरी…
वर्ष, एकूण जागा, काॅंग्रेसच्या जागा, मते%
१९५२, ४८९, ३६४, ४४.९९
१९५७, ४९४, ३७१, ४७.७८
१९६२, ४९४, ३६१, ४४.७२
१९६७, ५२०, २८३, ४०.७८
१९७१, ५१८, ३५२, ४३.६८
१९७७, ५४२, १५४, ३४.५२
१९८०, ५४२, ३५३, ४२.६९
१९८४, ५३३, ४१४, ४९.०१
१९८९, ५४५, १९७, ३९.५३
१९९१, ५४५, २४४, ३५.६६
१९९६, ५४५, १४०, २८.८०
१९९८, ५४५, १४१, २५.८२
१९९९, ५४५, ११४, २८.०३
२००४, ५४३, १४५, २६.७०
२००९, ५४३, २०६, २८.५५
२०१४, ५४३, ४४, १९.३०
२०१९, ५४३, ५२, १९.५