Mohammad Muizzu : मालदीवचे नवे राष्ट्रपती म्हणून मोहम्मद मुइज्जू यांनी शपथ घेतल्यानंतर भारताविरोधात पावले उचलण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. मालदीवमध्ये 77 भारतीय लष्करी जवान असून येथील नवीन सरकार भारतासोबत झालेल्या 100 हून अधिक करारांचा आढावा घेत आहे. याविषयीची माहिती मालदीवच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे दोन्ही देशातील संबंध आणखी ताणले जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यापूर्वी, देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतल्यानंतर 24 तासांपेक्षा कमी कालावधीत, मोहम्मद मुइझ्झू यांनी शनिवारी भारत सरकारला मालदीवमधून भारतीय सैन्य ‘माघारी’ घेण्याची औपचारिक विनंती केली. याठिकाणी एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना, राष्ट्रपती कार्यालयातील सार्वजनिक धोरणाचे अप्पर सचिव मोहम्मद फिरोजुल अब्दुल खलील यांनी, नवीन प्रशासनानुसार मालदीवमध्ये 77 भारतीय लष्करी कर्मचारी आहेत.
मालदीवच्या माध्यमांनी म्हटले आहे की, पहिल्या हेलिकॉप्टरचे व्यवस्थापन करण्यासाठी 24 भारतीय लष्करी कर्मचारी, डॉर्नियर विमानाचे व्यवस्थापन करण्यासाठी 25 भारतीय, दुसऱ्या हेलिकॉप्टरचे व्यवस्थापन करण्यासाठी 26 भारतीय आणि देखभाल आणि अभियांत्रिकीसाठी दोन आणि सदस्य आहेत. सप्टेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजयी झालेले अध्यक्ष मुइझू यांनी मालदीवमधून सर्व ७७ भारतीयांना हद्दपार करण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, मालदीव हा सामरिकदृष्ट्या हिंद महासागर क्षेत्रातील भारताच्या प्रमुख सागरी शेजारी देशांपैकी एक आहे. इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या मागील सरकारच्या काळात भारत आणि मालदीवमधील संरक्षण आणि सुरक्षा संबंध अधिक दृढ झाले होते. मालदीव हे भारताच्या नेबरहुड फर्स्ट धोरणाचा सर्वात मोठा लाभार्थी देश आहे. शनिवारी केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान, मुइझू यांनी भारत सरकारला अधिकृतपणे मालदीवमधून आपले लष्करी कर्मचारी मागे घेण्याची विनंती केली. मुइझूला चीन समर्थक नेते मानले जाते.