मुंबई – आम्ही आधी एकत्र नव्हतो म्हणून 2014मध्ये पराभवाला समोरे जावे लागले. आता आम्ही एकत्र आलो आहेत. देशात महागाई, बेरोजगारी वाढलेली असताना सत्ताधारी म्हणतायेत की देश प्रगती करत आहे. आधीसुद्धा खोटेच बोलले आणि निवडून आले. आतासुद्धा खोटे बोलत आहेत आणि लोकांना मूर्ख समजत आहेत.
परंतु, आता तसे होणार नाही, असा विश्वास लालूप्रसाद यादव यांनी केले. इंडिया आघाडीची बैठक मुंबईत अटोपल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्या भाषणाची थोडी विनोदीरितीने सुरुवात केली.
लालूप्रसाद यादव म्हणाले, आज देशात महागाई वाढत आहे. भेंडी साठ रुपये किलोने विकल्या जात आहे. तर टोमॅटोचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले. असे असताना मात्र, मोदी म्हणतात की, देश प्रगती करत आहे. यांचा हा फंडाच आहे. सत्ताधारी नुसते खोटे बोलून निवडणुका जिंकत आहेत.
देशात आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, देशातील अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटू लागले आहे. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर असताना केंद्र सरकार त्यांच्यासाठी कुठलेही पाऊले उचलत नसल्याचे दिसून येत आहे.
अफवांना मी देखील बळी
सत्तेत येण्याआधी मोदी आणि त्यांचे सहकाऱ्यांनी खूप थापा मारल्या. त्यांनी अशी अफवा पसरवली होती की, लालूप्रसाद यादव यांच्यासह देशातील असंख्य नेते भ्रष्ट असून, त्यांचे पैसे हे स्वीस बॅंकेत आहेत. मोदी सत्तेवर आल्यानंतर तो पैसा ते भारतात आणणार असून,
प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देणार. मीसुद्धा त्या अफवांना बळी पडलो आणि बॅंकेचे खाते उघडले देशवासियांसारखेच. मात्र, अद्याप ते 15 लाख माझ्या खात्यात आले नसल्याचे म्हणत मोदींवर निशाणा साधला.