मुंबई : वंचित आघाडीसोबत निवडणू लढण्याचा पक्ष पुनर्विचार करत आहे. त्यासाठी पक्षाध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी तडजोडीस तयार आहेत, अशी माहितएमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. ही आघाडी झाल्यास राष्ट्रवादी- कॉंग्रेससमोरील आव्हान वाढणार आहे.
मागील आठवड्यात वंचित बहुजनबरोबरची आघाडी तुटल्याची घोषणा एमआयएमने मागील आठवड्यात केली. त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी जलील यांच्याशी नाही तर ओवेसी यांच्याशी चर्चा करू. आघाडीचा पर्याय अखेरच्या क्षणापर्यंत कायम असेल असे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर जलील यांच्या या विधनाला महत्व प्राप्त झाले आहे.
जलील म्हणाले, एमआयएम-वंचित आघाडी होण अवघड आहे, असं मला वाटत नाही. मोठा भाऊ म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपावर तोडगा काढला, तर पुन्हा नव्याने सुरूवात करण्याची आमची इच्छा आहे. प्रकाश आंबेडकरांनी असदुद्दीन ओवेसींसोबत पुन्हा चर्चा करण्याची तयारी दर्शवली तर आम्ही तयार आहोत, असे जलील म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ईमेलवरून खासदार ओवेसी यांना जागा देण्याचा प्रस्ताव पाठवला. त्यामुळे ओवेसी निराश झाले. ओवेसी यांच म्हणण होत की, मी बाळासाहेबांना प्रचंड आदर दिला. त्यांनी एक फोनतरी मला करायचा होता. त्यानंतर आपण चर्चा केली असती. पण ईमेलद्वारे जागावाटपाचा प्रस्ताव पाठवणे हे धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया ओवेसी यांनी दिल्याचे जलील यांनी सांगितले.
ते म्हणाले, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हा पर्याय लोकांना नको आहे. त्यामुळे एमआयएम किती जागा लढवेल हे याबाबत आताच निश्चित सांगता येणार नाही. 60 ही संख्या आम्ही पार करणार नाही, अशी माहिती जलील यांनी दिली.