आळंदी – कार्तिकी एकादशीनिमित्त अलंकापुरीत असल्याने माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी पुणे जिल्ह्यातच नव्हे; तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक आज पहाटेपासूनच इंद्रायणी तीरी पवित्र स्नान करण्यासाठी मोठ्या भक्तिभावाने लाखोंच्या संख्येने एकवटले होते. पहाटे साडेचारनंतर आरती होताच भाविकांनी माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.
संपूर्ण दिवसभर गर्दी सुरू होता. त्यासाठी नवीन दर्शन मंडप खुले करण्यात आले होते. यावेळी पुणे येथील विजेंद्र पवार यांनी माऊली मंदिर परिसर माऊलीचे गोजिरे रूप तसेच पालखी सजावट ही सुगंधी आकर्षक मुलांनी केली होती. त्यामुळे सर्व भाविकांचे लक्ष याकडे लागले होते, असे देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले.
सायंकाळी साडेपाच नंतर माऊलींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा होऊन पुन्हा एकदा पुंडलिक वरदे हरी विठ्ठलाचा गजर, टाळमृदंगाचा निनादगाणी ऐकू येत होता.
नगरप्रदक्षिणा वेळी माऊलीच्या पालखीचे पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आळंदीकरांचा भाविकांनी देखील मोठी गर्दी केली होती. रात्री साडेआठनंतर पालखी मंदिर परिसरात करून पुन्हा पालखी मंडपात विसावली मानकऱ्यांना नारळ प्रसादाचे वाटप करून आजच्या कार्तिक वारीची नगरप्रदक्षिणा पूर्ण केली.
आज संपूर्ण दिवसभर भाविक मिळेल त्या वाहनाने अलंकापुरीकडे येताना दिसत होते. तसेच माऊलींचे दर्शन झाल्यानंतर येथून जवळच असलेले श्रीक्षेत्र देहू तुकाराम महाराज यांचे स्थान येथे हे भाविकांची ये-जा सुरू होती. आज पंधरा दिवसांनी म्हणजेच शनिवारी (दि. 23) कार्तिकी एकादशी होत असून, त्यासाठी आळंदी नगरपरिषद प्रशासन पुणे जिल्हा प्रशासन तसेच स्थानिक पातळीवरील स्वयंसेवी संस्था यादेखील आपापल्या परीने कामाला लागल्या आहेत. येत्या वीस तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत कार्तिक वारीचा सोहळा संपन्न होणार आहे, यासाठी राज्य परिसरातून चार लाखांवर भाविक आळंदीत येऊन दाखल होतील.