लखनौ – महाराष्ट्रात जे काही होते आहे, ते सर्व उत्तर प्रदेशच्या निवडणूकांमध्ये प्रभाव टाकण्यासाठी होते आहे, अशी टीका बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्रातील मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉन्डरिंगच्या आरोपाखाली सक्तवसूली संचनालयाने काल अटक केल्याच्या पाश्वभुमीवर त्यांनी ही टीका केली आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिमशी संबंध आणि मनी लॉन्डरिंगशी संबंधित आरोप त्यांच्यावर आहेत. मात्र आपल्या देशात दहशतवादाच्या नावाखाली आणि दहशतवादाच्या प्रकरणांच्या तपासाच्या नावाखाली महाराष्ट्रात जे काही चालले आहे ते उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणूका जिंकण्यासाठीच चालले आहे, असा आरोप मायावतींनी केला आहे. जनतेने या प्रकारांपासून सावध रहायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी केली आहे.