Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण केल्यानंतर मनोज जरांगे पाटील (manoj jarange patil) यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची डेडलाइन दिली आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता जरांगे पाटील (manoj jarange patil) पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. आजपासून (१५ नोव्हेंबर) त्यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात होत आहे.
आज सोलापूरच्या (Solapur) करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 1 या ठिकाणी जरांगेंची भव्य सभा होत आहे. तब्बल १२५ एकर शेतात या सभेचं नियोजन करण्यात येत आहे. तसेच, सकल मराठा समाजाच्या वतीने या सभेची तयारी करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने नुकतीच सभास्थळाची पाहणी देखील करण्यात आली.
येत्या शुक्रवार १७ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे आठ वाजता विट्यातील श्री चौंडेश्वरी मंदिर चौकात सांगली जिल्ह्यातील पहिली सभा होत आहे. ही सभा यशस्वी होण्यासाठी सकल मराठा समा जाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
खानापूर तालुक्यातील सर्व गावात आणि वाड्यावस्त्यांवर पत्रके वाटली गेली आहेत. शिवाय पोष्टर्स लावलेल्या रिक्षा आणि डीजे लावलेली वाहने शिवाय व्हाट्स अप,फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारख्या समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात या सभेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे.
तसेच, शुक्रवारी १७ नोव्हेंबर रोजी संपूर्ण व्यापार पेठ बंद ठेवण्यात येणार आहे. जरांगे पाटील यांची ही जिल्ह्यातील पहिलीच सभा असल्याने ती विक्रमी सभा होईल, असा संयोजकांचा विश्वास आहे. आ
दरम्यान, सभेला येणाऱ्या वाहनांची व्यवस्था शंभर फुटी रस्त्याकडेला पार्किंग व्यवस्था ठेवण्यात आली आहे. प्रत्यक्ष सभेच्या ठिकाणी पाच फूट उंचीचे व्यासपीठ तसेच आठ फुटीचा रॅम्प, १५ फुटांचा डी- झोन ठेवण्यात आला आहे. शिवाय सभेच्या ठिकाणी पाच ठिकाणी एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे.
या ठिकाणी 70 हजाराहून अधिक लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येणारी गर्दी लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याचीही सोय करण्यात आली आहे. शिवाय संपूर्ण सभेच्या परिसरावर नियंत्र ण ठेवण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठे अत्या धुनिक कॅमेरे असलेले फिरते ड्रोन ठेवण्यात आले आहेत असेही मोहिते यांनी सांगितले आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी मागील काही दिवसात ओबीसी नेत्यांवर देखील टीका केली होती. मंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजयी वेडट्टीवार जरांगेंच्या निशाण्यावर आहे. त्यातच, भोकरदनमध्ये गाव बंदीचे बॅनर फाडल्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर देखील जरांगे नाव न घेता टीका केली. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील या सभेतून जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.