Manoj Jarange Patil – ज्या समितीचे प्रमुख जालन्यात जाऊन मनोज जरांगेंना सर सर म्हणतात त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. तसेच ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्यालाच आरक्षण मिळावे, त्याच्या नातेवाईकांना नको, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली.
राज्याच्या एका मंत्र्यांनेच राज्य सरकारने नेमलेल्या समितीला विरोध केल्यामुळे अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. अशात आज छगन भुजबळ यांच्या टीकेला मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका मांडली.
पत्रकार परिषदेत बोलतांना, ओबीसींनी काय न्याय मिळणार आहे? भुजबळांच्या या टीकेवर मनोज जरांगे पाटील म्हणाले,’न्यायाधीश पाठवणं हे चूक म्हणता येणार नाही. भुजबळ आता तर खूप खालच्या स्तरावर बोलत आहेत. देशात न्याय देण्याचं काम न्यायाधीश करतात. एक जीव वाचवण्याचं काम त्यांनी केलं. ते सत्तेत आहेत. आम्ही जनतेत आहोत. न्यायमूर्ती जनतेला वाचवायला येतात, त्यावर तुमची अशी भावना असेल तर तुमच्याबद्दल काय बोलावं?’ असा प्रश्नच जरांगे यांनी उपस्थित केला.
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले, न्यायमूर्तींनी हातपाय जोडले नाहीत. आपण सहज रामराम, नमस्कार म्हणतो. त्यानी येऊन न्यायदानाचंच काम केलं. त्यांनी जीव वाचवण्याचं काम केलं. म्हणजे न्यायदानाचंच का काम केलं. त्यांनी काय वाईट केलं? तुम्ही तर कुणाचा जीव वाचवायला तयार नाहीत. तुम्ही तर हल्ला करुन जीव घ्यायला निघाला आहात’ असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी भुजबळ म्हणाले होते की, मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावे, वातावरण शांत व्हावे यासाठी आमचे नेते त्यांच्याकडे जातात ते ठीक आहे. मंत्री जातात, न्यायमूर्ती जातात, तेही त्यांना हात जोडून सांगतात. मला सांगा, आमचे मंत्री वगैरे ठीक आहे, पण न्यायमूर्ती, ज्यांच्या हातून ओबीसी कोण याचा निकाल लावण्यासाठी काम करत आहेत. त्यांच्या नेतृत्वात आयोग नेमले जातात, तेच तिकडे गेले तर ओबीसींनी काय न्याय मिळणार आहे? अशा लोकांकडून आम्हाला काय न्याय मिळणार जे तिकडे जावून हात जोडतात? असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला. असेही ते म्हणाले होते यावरून आज पत्रकार परिषदेत जरांगे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.