Manoj Jarange Patil Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीबाबत समाजाची भूमिका निश्चित करण्यासाठी अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटीत बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी जरांगे पाटील यांनी लोकसभेबाबतचे काही महत्वाचे निर्णय घेत असल्याचे जाहीर केले.
“आतापर्यंत अनेक खासदार दिल्लीला गेले. पण त्याचा आपल्याला काही उपयोग नाही. आपला प्रश्न दिल्लीतला नाही. तो राज्यातला आहे. मराठा समाजानं कोणत्याही सभेला जाऊ नये. कोणत्याही पक्षाचा प्रचार करायचा नाही. पण मतदान शंभर टक्के करा” असे आदेश जरांगे यांनी यावेळी दिले. | Manoj Jarange Patil Loksabha Election
“लोकसभेला एका मतदारसंघात शेकडो मराठा उमेदवार उभे केल्यास मत फुटतील. त्यापेक्षा जिल्ह्यातून एकच अपक्ष उमेदवार द्या आणि त्याच्या मागे संपूर्ण ताकद उभी करा, कोणाला उमेदवारी द्यायची त्याचा निर्णय तुम्ही घ्या. ते मी सांगणार नाही,” असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. | Manoj Jarange Patil Loksabha Election
एकमतानं प्रत्येक जिल्ह्यातून अपक्ष उमेदवार उभा करू. यासाठी गावाकडे जा, गावात सर्व मराठ्यांची बैठक घ्या सर्वांना मान्य असलेला उमेदवार द्या आणि मला कळवा मग आपण उमेदवाराची घोषणा करू असं देखील जरांगे यावेळी म्हणाले. | Manoj Jarange Patil Loksabha Election