Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव शुक्रवारी सकाळी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाले. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे.
आज दुपारीच 3 वाजता मनोज जरांगे पाटील आपली निर्णायक भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे मनोज जरांगे यांच्यासोबतचं भगव वादळ मुंबईत धडकणार की हे वादळ मुंबईच्या वेशीवरूनच परत जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. सरकारने काढलेला जीआर मनोज जरांगे पाटील यांना दाखवण्यात आला आहे. त्यावर मनोज जरांगे आपली भूमिका मांडणार आहेत. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या भाषणात बोलताना जरांगे पाटील म्हणाले,
‘शिंदे समितीची मुदत वर्षभरासाठी वाढवा अशी मागणी देखील यावेळी मनोज जरांगे यांनी केली आहे. तसेच सगेसोयऱ्यांसोबतचा अद्यादेश काढावा असं देखील मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलं. 100 टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला शिक्षण मोफत करावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी केलीये. तसेच भरती करताना मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवाव्यात अशी मागणी देखील यावेळी मनोज जरांगे यांनी केलीये.