Manoj Jarange on Reservation : मारत समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केले आहे. त्यातच आता आज मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला. यावेळी त्यांनी,”मराठा आरक्षणासाठीच्या सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे नाहीच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मनोज जरांगे यांनी यावेळी आम्ही सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणी वर ठाम आहोत. मराठ्यांना फसवलं तर सोडणार नाही. सरकारनं धोरण ठरवलं असलं तरी मराठेही धोरण ठरवणार असल्याचे त्यांनी म्हटले.
हेहीवाचा
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ; म्हणाले,”जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना…”
…तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही
”ज्यांच्या कुणबी नोंदी सापडकयत आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना सग्यासोयऱ्याचा कायदा आहे, त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असं जरांगेंनी म्हटलं आहे. मराठवाड्यातील सगळा मराठा कुणबी आहे. कुणबी नोंदी सापडल्या त्यांना द्यावेच लागेल, मात्र मागासवर्गीय अहवाल घेऊन ते आरक्षण देताला, मात्र ते चालणार नाही, सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्या शिवाय कोणाला सोडणार नाही. मागासवर्ग आयोगाचे पण राहु द्या, ज्यांना नकोय त्यांना जोर जबरदस्ती नाही. 20 तारखेपर्यंत अंमलबजावणी करा. अशी मागणीदेखील त्यांनी यावेळी केली.
मुंबईला गेल्याने आपली फसवणूक झाली नाही Manoj Jarange on Reservation।
जरांगे यांनी, ”मुंबईला गेल्याने आपली फसवणूक झालेली नाही. तर सरकारने अधिसूचनेची अंमलबजावणीत न करत सरकारने फसवणूक केली असे म्हटले. मुंबईला गेल्यामुळे गोड-गोड बोलले, आपली फसवणूक झाली, असे नाही, सगेसोयऱ्यांची अधिसूचना निघाली. मराठा समाजाच्या सगळ्या मुलींना एकही रुपया न देता मोफत शिक्षण मिळणार, असा कायदा आणि निर्णय घेऊन आपण मुंबईवरून आलो आहोत.”
20 फेब्रुवारीपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा Manoj Jarange on Reservation।
”फसवणूक किंवा गैरसमज झाला म्हणून आरक्षणाचा विषय संपणार नाही. काही जण म्हणतात आपल्याला फसवलं, फसवलं असेल तर फसवून दे पण, आपण सहजासहजी सोडणारे मोडक्या पायाचे नाहीत. पुन्हा लढा सुरु करू, आपण आपल्यावर विश्वास ठेवायचं. सगेसोयरा कायदा बनवून त्यांची अंमलबजावणी करण्यावरचं आम्ही ठाम आहोत”, असेही जरांगे यांनी म्हटले.