मुंबई :- जे उध्दव ठाकरे (Uddhav thackeray) सत्तेत असताना अडीच वर्षे घरात बसून होते, ज्यांनी करोना काळात महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं, गेल्या महिन्यात जे १५ दिवस परदेश दौऱ्यावर जाऊन सुट्टी एन्जॉय करून आले ते देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावर टीका करत आहेत.
फडणवीस यांचा जपान दौरा तुमच्यासारखा सुट्टी एन्जॉय करण्यासाठी नव्हता तर राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी होता, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उध्दव ठाकरे यांना फटकारले आहे.
पुढे त्यांनी म्हटले आहे की, उद्धव जी एक लक्षात घ्या, तुम्ही आता विवेकभ्रष्ट, नितीभ्रष्ट झाला आहात. म्हणूनच देवेंद्रजी यांच्यावर टीका करताना तुम्हाला सडकछाप शब्दांचा वापर करावा लागत आहे. तुमचे हे नैतिक अधःपतन महाराष्ट्र बघत आहे.
आदरणीय नरेंद्र मोदी (narendra modi) जींच्या कर्तृत्वामुळे तुमच्या घमेंडियाला घरघर लागली आहे. त्यामुळे तुम्ही हर घर मोदी अभियानावर टीका करत आहात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. मोदीजी आणि देवेंद्रजींवर असलेल्या जनतेच्या प्रेमामुळेच तुमच्या अहंकाराचा येत्या निवडणुकीत पराभव होईल, असं देखील बावनकुळेंनी म्हटलं आहे.