मुंबई – महाराष्ट्रामध्ये तब्बल 56 हजार इतके कोट्याधीश आहेत. भारतामध्ये कोट्यधीश जास्त संख्येने असलेल्या राज्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रानंतर उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात या राज्यांचा नंबर लागतो.
भारतात एकूण 4.12 लाख कोट्याधीश आहेत. ही माहिती हरून इंडिया या संस्थेच्या अहवालात देण्यात आली आहे. यामध्ये ज्या नागरिकांचे उत्पन्न हे एक दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त आहे अशा व्यक्तीचा समावेश करण्यात आला आहे. 10 लाख डॉलर म्हणजे सर्वसाधारणपणे 7.5 कोटी रुपये होतात. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा 16 टक्के इतका आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात अब्जाधीशांची संख्या जास्त असणे अपेक्षित आहे. आर्थीक वर्ष 2013 ते आर्थिक वर्ष 2019 या दरम्यान महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 6.9 टक्के दराने वाढली असल्यामुळे अब्जाधीशांच्या संख्येत वाढ झाली आहेत. महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती पैकी 247 व्यक्ती वास्तव्य करतात. त्यामध्ये मुंबईचा वाटा सर्वात जास्त आहे.
कोट्यधीशांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उत्तर प्रदेशामध्ये अब्जाधीशांची संख्या 36 हजार आहे. तर तामिळनाडूत 35 हजार इतकी आहे. चौथ्या क्रमांकावरील कर्नाटकमध्ये ते 33 हजार अब्जाधीश आहेत. गुजरात राज्य पाचव्या क्रमांकावर असून गुजरात मध्ये अब्जाधीशांची संख्या 29 हजार इतकी आहे.
पश्चिम बंगाल मध्ये 24 हजार, राजस्थानमध्ये 21 हजार आंध्र प्रदेशामध्ये 20 हजार, मध्य प्रदेशामध्ये 18 हजार अब्जाधीश आहेत. तेलंगणा राज्यातही अब्जाधीशांची संख्या 18 हजार इतकी आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान 6.2 टक्के आहे. मुंबईमध्ये 16 हजार 933 अब्जाधीश राहतात. दिल्लीमध्ये 15 हजार 861 अब्जाधीश राहतात. बंगळूरू शहरातील अब्जाधीशांची संख्या 7582 आहे. तर चेन्नई मध्ये 4 हजार 685 अब्जाधीश राहतात.