मुंबई – बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल करण्यात आला असून 5 आणि 7 मार्चला होणारे पेपर हे आता 5 आणि 7 एप्रिलला घेण्यात येणार आहे. 23 फेब्रुवारीला प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोला पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात जवळ आग लागली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारावीच्या परीक्षा 4 मार्चपासून सुरू होणार आहे. दोन पेपरमध्ये हा बदल करण्यात आला आहे. 5 मार्चला होणारा हिंदीचा पेपर आता 5 एप्रिलला तर 7 मार्चला होणारा मराठीचा पेपर हा 7 एप्रिलला घेण्यात येणार आहे.
दरम्यान, दहावी बारावीच्या पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला चंदनापुरी घाटात मागच्या बाजूने ही आग लागली होती. या आगीमध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. त्यामुळे परीक्षा तोंडावर असताना प्रश्नपत्रिका जळाल्याने वेळापत्रकात अंशतः बदल करून हे दोन पेपरची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत. राज्य शिक्षण मंत्रिमंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.