मुंबई – अभिनेत्री स्वरा भास्करचे नुकतेच लग्न झाले आहे. अभिनेत्रीने सपा नेता फहाद अहमदसोबत लग्न केले आहे. या दोघांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यापासून अनेक लोक स्वरा भास्करला ट्रोल करत आहेत. आता नुकतेच अयोध्या हनुमानगढीचे महंत राजू दास यांनी स्वरा भास्करच्या लग्नाबाबत वादग्रस्त विधान केले आहे.
राजू दास यांनीही राखी सावंतचे उदाहरण दिले आहे. स्वराला अल्टिमेटम देत त्याने ‘स्वरा भास्करला हजारो पुरुषांसोबत रात्र घालवायची असेल तर लग्नाच्या शुभेच्छा’ असंही म्हटलं आहे. महंत राजू दास यांनी स्वरा भास्करच्या लग्नाबाबत दिलेले हे वक्तव्य सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
महंत राजू दास यांनी स्वरा भास्करच्या लग्नाबाबत दिलेले हे वक्तव्य सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यात तो ‘स्वरा भास्करने त्या समाजात लग्न केले आहे, ज्या समाजात बहिणींशी लग्न केले जाते, त्यानंतर महिलांना तलाक, तलाक , तलाक म्हणत अनेक पुरुषांसोबत रात्र काढावी लागते’ असे म्हणताना दिसत आहे.
एवढेच नाही तर राखी सावंतचे उदाहरण देत महंत राजू दास म्हणाले, ‘राखी सावंतचे उदाहरण सर्वांसमोर आहे, त्यामुळे स्वरा भास्करनेही आता हलालासाठी तयार राहावे.’