भोपाळ – मध्यप्रदेशातील शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आलेल्या अपयशाच्या संबंधात जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी कॉंग्रेसतर्फे (Congress) 19 सप्टेंबर पासून राज्यात जन आक्रोश यात्रा काढली जाणार आहे. ही यात्रा राज्यातील सर्व 230 विधानसभा मतदार संघातून काढली जाणार असून एकाच वेळी या यात्रा सात ठिकाणाहून काढल्या जाणार आहेत.
मध्यप्रदेश कॉंग्रेसचे (Madhya Pradesh Congress) अध्यक्ष कमलनाथ, राज्याचे प्रभारी रणदीप सिंग सुर्जेवाला यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राज्य सरकारने अनेक बाबतीत सरळसरळ भ्रष्ट व्यवहार केला आहे. त्याचा भंडाफोड आम्ही या यात्रेत करणार आहोत. राज्यातील बेरोजगारी, महिला आणि दलितांवरील अत्याचार गुन्हेगारी रोखण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे.
या सरकारच्या काळात तब्बल 250 घोटाळे झाले आहेत, शिवराजसिंह चौहान यांनी 18 वर्ष राज्य केले या अकार्यक्षम राजवटीत लोकांमध्ये त्यांच्या सरकार विषयी असलेला आक्रोश हा जन आक्रोश मध्ये बदलला आहे.
सुरजेवाला म्हणाले आणि मध्य प्रदेशात गेल्या 18 वर्षात 58,000 महिला आणि मुलींवर बलात्कार करण्यात आला आणि सुमारे 67,000 इतरांचे अपहरण करण्यात आले. ही यात्रा 15 दिवस चालणार असून त्यात यात्रेकरू 11 400 किमीचा प्रवास करणार आहेत. विरोधी पक्षनेते गोविंद सिंग, माजी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अरुण यादव, माजी मंत्री कमलेश्वर पटेल, जितू पटवारी, अजय सिंग, माजी केंद्रीय मंत्री सुरेश पंचौरी आणि कांतीलाल भुरिया यांच्यासह कॉंग्रेसच नेते विविध ठिकाणांहून ठिकाणाहून निघणाऱ्या यात्रेचे नेतृत्व करणार आहेत.