Rahul Gandhi on INDIA Alliance PM Face: लोकसभा निवडणुकीच्या तयारीदरम्यान इंडिया आघाडीच्या पंतप्रधान चेहऱ्याबद्दल साशंकता आहे. निवडणूक रॅलींमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते पंतप्रधानांच्या चेहऱ्यावरुन इंडिया आघाडीवर निशाणा साधताना दिसतात. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (5 एप्रिल) इंडिया आघाडीच्या चेहऱ्याबाबत प्रतिक्रिया दिली.
इंडिया आघाडीच्या पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर राहुल गांधी काय म्हणाले ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्याच्या लॉन्चिंगवेळी सांगितले की, “भारत एक वैचारिक निवडणूक लढत आहे आणि इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल.” एकीकडे पंतप्रधान मोदी आणि भाजप नेते जनतेकडून सलग तिसऱ्यांदा निवडून येण्याची मागणी होत आहे, तर विरोधी आघाडीने अद्याप देशाच्या सर्वोच्च पदासाठी आपला चेहरा ठरवलेला नाही.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इंडिया अलायन्सच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव इंडिया अलायन्सच्या पंतप्रधान चेहऱ्यासाठी सुचवले होते. यावर काँग्रेस अध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधानपदावर दावा करण्यासाठी आघाडीला आधी पुरेशा जागा जिंकाव्या लागतील
दरम्यान, 2014 साली भाजपची सत्ता आली आणि नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान करण्यात आले आणि त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने बाजी मारली. यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपने स्वबळावर 370 आणि एनडीएसोबत 400 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तर दुसरीकडे विरोधी आघाडीचा देखील जोरदार प्रचार सुरु आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत कोणाचा विजय होईल हे 4 जूनच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासने
१. लडाखमध्ये स्थिती कायम ठेवण्यावर भर दिला जाईल.
२. महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 50 टक्के आरक्षण देण्यासाठी राज्यघटनेत दुरुस्ती करणार.
३. पीएसयू आणि सरकारी नोकऱ्यांमधील कंत्राटी नोकऱ्या कायम केल्या जातील.
४. खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये एससी/एसटी, ओबीसी प्रवर्गाला आरक्षण देण्यात येईल.
५. रोहित वेमुलासारख्या विद्यार्थ्यांना जातीच्या आधारावर कोणत्याही प्रकारच्या छळापासून वाचवण्यासाठी कायदा करण्यात येईल.
६. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी निवृत्ती वेतन दरमहा 1,000 रुपये करण्यात येईल.
७. मोफत आरोग्य सेवा आणि निदान, शस्त्रक्रिया आणि औषधांसह सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी रु. 25 लाखांपर्यंतचा कॅशलेस विमा.
८. गरीब कुटुंबांसाठी महालक्ष्मी योजना सुरू करण्यात येणार आहे. जिथे त्यांना 1 लाख रुपये बिनशर्त दिले जातील.
९. पैसे खर्च करण्यापूर्वी ते आणण्याचे काम केले जाईल. कारण मोदी सरकारच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात लोकांचे पगार स्थिर आहेत
१०. देशव्यापी सामाजिक-आर्थिक जात जनगणना केली जाईल. ज्यामध्ये जाती आणि पोटजाती आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीची माहिती मिळू शकेल
११. एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांनी वाढवून त्यांना पूर्ण अधिकार दिले जातील
१२. एससी, एसटी आणि ओबीसीसाठी राखीव असलेल्या सर्व रिक्त पदांवर एक वर्षाच्या आत भरती केली जाईल
१३. पेपरफुटी रोखण्यासाठी नवीन कायदे आणि धोरणे बनवण्यात येतील
१४. अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि माध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणार
१५. नोकरदार महिलांसाठी वसतिगृहांची संख्या दुप्पट केली जाईल
१६. शेतकऱ्यांसाठी जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी हटवला जाईल आणि स्वामीनाथन फॉर्म्युलासह एमएसपीवर कायदेशीर हमी दिली जाईल
१७. पिकाचे नुकसान झाल्यास 30 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील
१८. मजुरांची रोजची मजुरी 400 रुपये करणार, याची मनरेगामध्येही अंमलबजावणी होणार आणि मनरेगासारखी नवी धोरणे शहरी भागासाठीही आणली जातील
१९. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना जीवन आणि अपघाती विमा दिला जाईल
२०. घटनादुरुस्तीद्वारे 50 टक्के मर्यादा हटवली जाईल
२१. एससी आणि एसटीसाठी त्यांच्या लोकसंख्येनुसार अर्थसंकल्पात तरतूद
२२. घरे बांधण्यासाठी, व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी संस्थात्मक कर्ज वाढवले जाईल
२३. सर्व आर्थिकदृष्ट्या दुर्बल जाती आणि समाजातील लोकांना कोणताही भेदभाव न करता नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 10 टक्के आरक्षण दिले जाईल
२४. उच्च शिक्षणासाठी एससी, एसटी आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची रक्कम वाढवून दुप्पट केली जाईल. पीएचडीमधील शिष्यवृत्तीही दुप्पट केली जाईल. तसेच परदेशातील अभ्यासासाठीही मदत करण्यात येईल.
२५. तरुणांना ४0 लाख सरकारी नोकऱ्या देणार