नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी १२ राज्यांमधील ९४ मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारी सुरू झाली. (Lok Sabha Election 2024: Application process for third phase begins)
निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींच्या वतीने अधिसूचना जारी केल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली आहे. १९ एप्रिल ही या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
तिसऱ्या टप्प्यात आसाम, बिहार, छत्तीसगड, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, गोवा, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या प्रदेशातील मतदार संघ समाविष्ट आहेत. १८ व्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिलला सुरू होणार आहे.