पटना: बिहारमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढतच आहेत. त्यामुळे राज्यात संक्रमणाचा वाढता धोका लक्षात घेता सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात एक नवीन आदेश शासनाने जारी केला आहे.
बिहार सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये गृहमंत्रालयाच्या आदेशाचा हवाला देऊन म्हटले आहे की, राज्यातील सद्यस्थिती लक्षात घेता लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे.
#Government of #Bihar has issued fresh order related to #lockdown.
Accordingly , the restrictions imposed vide order no. 102/वि. स. को. dated 30.7.2020 imposing further restrictions will remain effective till 06.09.2020. pic.twitter.com/ejtWp13bME— PIB In Bihar 🇮🇳 Mask yourself 😷 (@PIB_Patna) August 17, 2020
रविवारी रात्री 12 वाजता अनलॉक -3 ची अंतिम मुदत संपल्यानंतर राज्य सरकारने पुढील निर्णय घेतला. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात कोरोना संक्रमणाच्या वाढती घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 8 जुलैपासून पाटण्यात लॉकडाउन लागू केले होते. त्यानंतर 16 जुलैपासून राज्यभर लॉकडाउन लागू करण्यात आले, ते 31 जुलै पर्यंत वाढविण्यात आले होते. आता पुन्हा सरकारने 6 सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन वाढविले आहे.